महाराष्ट्रातून बिहारी निघून गेल्यावर सर्वात जास्त परीणाम होणार आहे ती लाँड्रीतून ईस्त्री करून घेणाऱ्यांची. . .हे गाणे एका अश्यांच ग्राहकाकडून आम्हाला ऐकायला मिळाले.
(चाल : ऐसा जादू डाला रे ऽ ऽ )
अस्सा सदरा माझा धुवा रे ,
सदरा हा कोणी माझा धुवा रे !।। ध्रु ।।
मळ जो सगळा काढून टाकील ,
नवीन चमक त्यांवर आणील ,
अस्सा भेटावा लाँड्रीवाला रे !
अस्सा भेटावा लाँड्रीवाला रे ! ॥१॥
गुण मी त्याचे गाईल ऽ ऽ गाईल ऽ ऽ गाईल ऽ ऽ
कपडे जो छान माझे धुवील ऽ ऽ धुवील ऽ ऽ धुवील ऽ ऽ
वेळेशीर जो सेवा देईल,
अस्सा लाभावा लाँड्रीवाला रे !
अस्सा लाभावा लाँड्रीवाला रे !
सदरा कुणी माझा धुवा रे ऽ ऽ ॥२॥
No comments:
Post a Comment