निवडणूका जवळ आल्या होत्या .जनतेचं प्रबोधन करण्यासाठी शासनाने ‘मतदारजाग्रुती समिती’ स्थापिली.आता समितीने जनतेचं प्रबोधन
त्यांना उमजेल अश्या माध्यमातून करायचं तरी कसं हा प्रश्न होता .त्यावेळी ‘अंडे का फंडा’ हे गाणं लोकप्रिय होतं .
धंदा धंदा धंदा धंदा धंदा धंदा ,
मतं मागणं हा झालाय धंदा ,
नका बळी पडू मतदारांनो यंदा ,
नाही ऽ ऽ ऽ तर होईल,हा सगळा ऽ ऽ च वांदा ,
सगळा ऽ ऽ च वांदा , वांदा,
सगळा ऽ ऽ च वांदा ॥ध्रु॥
पंचायत असो की,असो ती पालिका,
निवडणूकांमधून सगळ्या ,उमेदवार मागतात भिका ॥१॥
तुम्हीच लक्ष ठेवा ना ,
मत नीट आपले द्या ना,
शासन तुमचे आणा
शासन तुमचे आणा ।।२॥
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyaparag.blogspot.com
No comments:
Post a Comment