आला पाऊस ऒला ,
आनंदे नाचूनि बेडूक मेला
आल्या धावून सरी ,
पण मडकं राहीलं घरी !
म्हणे तो, “जाऊ पावसात,खाऊ मस्त पिझ्झा ”,
परि ती दटवी तयाला , “ खिचडी खा अन् गप निजा ”
कोसळला पाऊस किती ,
रस्त्या-रस्त्यांवर ओली माती
“ केव्हापातून लागून ल्हायलाय हा ! ”
म्हाता-यांची निराळीच किरकिर
पेन्शन मिळाया स्टेटबँकेमधूनी मात्र
भर पावसात फिरफिर !
ऒला पाऊस , ऒला आसमंत ऒला अन् हा वारा ,
थांबूनि घटकाभर मन म्हणे घेवूत घुटके आले चहाचे जरा
बसमधून उतरली
पाहून थेंबे थबकली
थबकली ती रजतचंद्रा,
छत्री उघडतांनाही करीतसे,
किती हो त्रासिक मुद्रा
खड्डे हॊऊनि रस्त्यांत
झाला ट्रॅफीक जॅम सारा
कडेस थांबूनि खातसे कणीस भाजके
तोच निसर्ग रसिक खरा !
पाऊस असा हा फुलवी,निराळी पुष्प अन लता
तृप्त करीतो क्षणार्धात तप्त ही धरणी माता
म्हणे ढगांसि लाविन टाचणी
घेवूनि आकाशी उंच झेप
पुरे ही तुझी थेरे मानवा
निसर्गा नको तुझा हस्तक्षेप !
पराग खैरनार,नाशिक
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com
parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
No comments:
Post a Comment